राज्यातील 70 उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या

मंत्रालय
 06 Sep 2019  5126

राज्यातील जवळपास 70 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 7 सप्टेंबर 

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार  महसूल विभागाने अखेर  बदल्यांचा  मुहूर्त मिळाला असून पात्र असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी मोहिम 30 ऑगस्ट  पर्यन्त राबविण्यात आली असल्याने नियमित बदल्यांच्या कालावधी बाधित झाला होता. त्यामुळे  निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने आणि निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार  राज्यातील औरंगाबाद,नाशिक,पुणे आणि अमरावती  या महसूल विभागातील जवळपास 70 उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. यात प्रांत,निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पदावर  नियुक्त्या करण्यात आल्या असून जाहिर केलेल्या शासन आदेशाची प्रत खालील प्रमाणे